ISSN No: 2231-5063
Useful Links
Article Details ::
Article Name :
अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीचे समाजशास्त्रीय महत्त्व
Author Name :
बालाजी पिडगे
Publisher :
Ashok Yakkaldevi
Article Series No. :
GRT-6226
Article URL :
Author Profile    View PDF In browser
Abstract :
अण्णाभाऊ साठे हे विसाव्या शतकातील एक प्रतिभावंत मराठी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी वाङ्मयातून विपूल स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यांनी अनेक कथा, कादंब­या, कविता, तमाशे, लावण्या, पोवाडे, छक्कडे लिहिलेली आहेत. समताधिष्ठित समाज संरचना, वर्ग आणि जातीव्यवस्था नष्ट करणे आणि विनाशर्त मानवतेचा पुरस्कार हे त्यांच्या साहित्याचे मुख्य उद्दिष्ट होते. हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून पददलितांच्या व क ामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांच्या समग्र साहित्याचे अंत:सूत्र होते. विशेषत: अण्णाभाऊ साठे यांनी 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनावर आधारित अनेक कथा-कादंब­या लिहिल्या आहेत. ‘वारणेच्या खो­यात’ आणि ‘मास्तर’ या कादंब­यांतून समकालीन राष्ट्रीय स्वातंत्र्यआंदोलनाचे चित्रण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या साहित्यात माक्र्सवादी विचारांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा अंगीकार केलेला दिसून येतो. वर्गव्यव्स्थेबरोबरच जातीयव्यवस्थेविरुद्ध बंडखोर असे लिखान त्याच्या साहित्यात दिसून येते
Keywords :
  • ???????? ???????? ????,???????,???? ????????,????????????? ????????? ???????,
Best Viewed in IE7+, Chrome, Mozilla Firefox. Copyright © 2012 lbp.world All rights reserved.